Iyatta 9vi Vishay Marathi Big 5 Chya Sahavasat swadhyay | इयत्ता ९वी मराठी बिग ५ च्या सहवासात स्वाध्याय
प्र. १. केनया पार्कमध्ये फिरण्याचे थ्रिल खालील मुद्दा विचारात घेऊन लिहा.
'गेम ड्राइव्ह'
उत्तर:
प्र. २. टिपा लिहा.
(१) केनयातील पर्यटन क्षेत्राबाबत तेथील सरकारची भूमिका.
उत्तर:
पर्यटन
क्षेत्र विकसित करण्याबाबत केनिया सरकार अतिशय दक्ष आहे. पर्यटकांनी जंगलात
फिरताना कोणती दक्षता घ्यावी, याबाबत सरकारने काही नियम केले
आहेत. मोटारीतून फिरताना पर्यटकांनी शक्यतो मुख्य रस्ता सोडून आत जाऊ नये. एखादा
दुर्मीळ प्राणी दिसला, तरच तात्पुरते झुडपात शिरावे, पण लवकर मुख्य रस्त्यावर यावे. जनावरांशी बोलू नये, टाळ्या वाजवू नयेत व त्यांना खादय देऊ नये. सिंह, गेंडा,
लेपर्ड-चित्ता यांच्या सभोवताली पाचपेक्षा जास्त मोटारींनी थांबू नये.
जनावरांचा पाठलाग करू नये. त्यांना त्रास देऊ नये. नियमांचे पालन न करणाऱ्या
पर्यटकांना दंड करून लगेच पार्कबाहेर काढण्याचे अधिकार केनिया सरकारने तेथील
रेंजर्सना दिले आहेत.
इयत्ता नववी मराठी गाईड pdf | बिग ५ च्या सहवासात मराठी स्वाध्याय ९वी
इयत्ता नववी मराठी स्वाध्याय बिग ५ च्या सहवासात | इयत्ता नववी मराठी pdf कुमारभारती
(२) 'बिग ५' चे थोडक्यात वर्णन.
उत्तर:
सिंह, लेपर्ड-चित्ता, गेंडा, हत्ती व
जंगली म्हैस या पाचही प्राण्यांची जमिनीवर शिकार करणे अत्यंत अवघड आहे. तसेच ते
आकाराने मोठे असल्यामुळे त्यांना 'बिग 5' असे म्हणतात.
सिंहाचे
सुमारे तीस जणांचे कुटुंब असते. दिवसाचे वीस तास सिंह आळसावून पडलेला असतो. तो
क्वचित शिकार करतो. सिंहाला जंगलात एकही शत्रू नाही. सिंहाचा एकमेव शत्रू माणूस
होय.
लेपर्डची शेपटी लांब व टोकापासून मध्यापर्यंत तिच्यावर ठिपके असतात. लेपर्ड सूर्यास्ताच्या वेळी किंवा रात्री शिकार करतो. तो सावजाला ओढत झाडावर नेतो. त्याचे आयुष्य वीस वर्षे असते. त्याच्या कातडीला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जबरदस्त मागणी आहे.
चित्ता हा
सर्वांत अतिचपळ प्राणी ताशी 100 किमी वेगाने पळतो. त्याची शिकार करण्याची पद्धत
वेगळी आहे. तो सावजाजवळ दबकत जातो, एकदम हल्ला करतो व गुदमरून
मारतो. शिकार खायची नसेल, तर ती पालापाचोळचाने झाबून ठवतो.
Iyatta 9vi Vishay Marathi Big 5 Chya Sahavasat swadhyay | 9th standard Marathi digest pdf Big 5 Chya Sahavasat swadhyay | 9th class marathi question and answer Dupar
प्र. ३. पाठाच्या आधारे सिंहाचे कुटुंब व लेखकाचे कुटुंब यांच्या भेटीचा प्रसंग तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर:
लेखक नकुरू हे
मसाईमारा असा एक मोटारीने प्रवास करीत होते. दुपारच्या जेवणाच्या वेळी ते मारा
सिना लॉजकडे गेले होते. त्यात फरीदने गाडी कमरेएवढ्या उंच गवतात घुसवली. गवतात
वनराज सिंह मस्त विश्रांती घेत होते. सगळे कुटुंब समोर आले होते. दोन-तीन सिंहिणी
आणि त्यांची दहा बाळे होती. शेजारीच एक म्हैस मरून पडली होती. चार-पाच बछूडे आणि
सिंहिणी त्यावर ताव मारत होत्या. खाण्याने सिंहराज तृप्तीने विसावले होते. एक
सिंहीण सिंहाजवळ आली आणि "मी पाणी पिऊन येते, तू जरा
बछ्यांना सांभाळ" सिंहाला सांगून गेली, असा जणू त्यांचा
संवाद झाला असावा. सर्व सिंह कुटुंबीयांनी मोटारीला खेटून मोटारीच्या सावलीत मस्त
पहुडले होते. एक बछडा सिंहाच्या आयाळीशी खेळण्याचा प्रयत्न करत होता. सिंहाने ते
थोडावेळ सहन केलं. पण नंतर एक हलकासा पंजा मारून, 'त्रास देऊ
नकोस' म्हणून बछड्याला सुनावलं. हा सगळा चित्तथरारक सोहळा
लेखकांच्या कुटुंबीयांनी अनुभवला.
9th class marathi question and answer pdf download | 9th std marathi digest pdf navneet | Big 5 Chya Sahavasat class marathi question and answer sthaulvachan
प्रवासवर्णन लिहूया.
प्रवासवर्णन
म्हणजे एखाद्या स्थळाला भेट देऊन आल्यानंतर त्या ठिकाणचे घेतलेले अनुभव व त्या
ठिकाणी पाहिलेल्या स्थळांचे बारकाव्यांसह निरीक्षण शब्दबद्ध करणे होय.
· प्रवासवर्णन कसे लिहावे?
प्रवास वर्णन
लिहिताना त्यात खालील मुद्द्यांचा विचार व्हावा.
(१) प्रवासाचे ठिकाण :
ठरवलेल्या
ठिकाणची भौगोलिक, ऐतिहासिक वैशिष्टये, तेथील हवामान स्थिती, नियोजित ठिकाणी पोहोचण्याचे
मार्ग या सगळ्याच्या पूर्वतयारीविषयी थोडक्यात माहिती घेणे आवश्यक आहे.
(२) नेमके काय पाहिले :
जिथे भेट
देणार तिथले लोकजीवन, संस्कृती, वेशभूषा,
बोलीभाषा खाद्यपदार्थ आणि अर्थातच निसर्ग, ऐतिहासिक,
भौगोलिक महत्त्व इत्यादी.
(३) सूक्ष्म निरीक्षण :
प्रवास करताना
निरीक्षणातून लक्षात आलेले छोटे बारकावे, तपशिलांची नोंद करून
ठेवावी. लेख लिहिताना अशी काही निरीक्षणे नोंदवल्यास आपल्या लिखाणाला वेगळे परिमाण
मिळते.
(४) सहज संवादात्मक लेखन :
प्रवासवर्णनाची
शैली ही उत्कंठावर्धक तरीही सहज असावी. लिखाणातला ओघ कायम राहील याचे भान ठेवावे.
(५) संस्मरणीय प्रसंग :
प्रवासाचा
आनंद घेता-घेता घडणाऱ्या अनपेक्षित घटना, प्रसंग, क्वचितप्रसंगी आलेल्या अडचणी, त्यांवर केलेली मात
याचा उल्लेख प्रवासवर्णन लिहिताना जरूर करावा. प्रवासवर्णन म्हणजे प्रवासाच्या
तयारीपासून सुरू होणारा हा सिलसिला प्रवास संपून, मूळ जागी
येऊन स्वस्थता मिळेपर्यंत अव्याहतपणे आपसूक सुरूच असतो. प्रवासातील वेगळेपण,
निरनिराळ्या व्यक्ती, आलेले हटके अनुभव,
काही अद्भुत गोष्टी या सर्वांची एक सुंदर अनुभूती तयार होते. सखोल
निरीक्षणातून ती उठावदार बनते. त्यातून प्रवासवर्णन हा एक बोलका, अक्षरबद्ध नजारा तयार होतो. त्यामुळेच निरीक्षणे, माहिती,
वैशिष्ट्ये, आलेल्या अडचणी आणि विलक्षण अनुभव
तसेच केलेली धमाल, या सर्व गोष्टी सहजपणे लिहिल्या की
प्रवासवर्णन तयार होते.
*******